AI-Based Tiger Alarm System
esakal
मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नागपूरजवळील पेंच व्याघ्र प्रकल्पात अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित 'टायगर अलार्म सिस्टम' बसविण्यात आली आहे. वाघ किंवा बिबट्याची चाहूल लागताच गावकऱ्यांना आधीच सावध करणारा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'मार्व्हल' या कंपनीने ही प्रणाली विकसित केली असून नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.