
अमरावती : आपले कर्तव्य बजाविणाऱ्या एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्या राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी सांगितले, पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले, भाजपच्या नावाने पालकमंत्री शिमगा करीत आहेत, मात्र वास्तविक न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.
न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आल्याने ज्या महिला व बालकल्याण विभागाच्या त्या मंत्री आहेत त्या विभागाला आता त्या कशापद्धतीने न्याय देवू शकतील, अशा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशोमती ठाकूर यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी सुद्धा पालकमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. पत्रपरिषदेला संध्या टिकले, मीना पाठक, दीपक खताडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही भाजपच्या विचारधारेविरोधात लढत आहोत. भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांच्या मागील पाच वर्षांतील कारनाम्याबाबत बोलावे, जलयुक्त शिवार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. भाजपविरोधातील वैचारिक लढा सुरूच राहील.
- यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री.
संपादन - नरेश शेळके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.