

Wardha
esakal
सेवाग्राम: मुसळधार पावसात विहिरीत पडून तब्बल १८ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेतमजुराला ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या आर्मी एनसीसी अधिकारी व जवानांनी वेळेत मदतीचा हात देत जीवनदान दिले. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, प्रसंगावधान आणि तातडीची कृती यामुळे ही बचावमोहीम यशस्वी ठरली. बापूरावजी देशमुख फाउंडेशनच्या वसतीगृह परिसरामागील शेतातील विहिरीत शेतमजूर जीवन ताकसांडे (वय ५५) पाय घसरून शुक्रवारी (ता.३) सायंकाळी सहा वाजता पडले. यावेळी परिसरात मुसळधार पाऊस असल्याने त्यांच्या मदतीचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही.