एसटी आहे नावाला, कसं जाऊ शाळेला!

2092a276-7216-442f-a809-5544b19e8c3f.jpg
2092a276-7216-442f-a809-5544b19e8c3f.jpg

बोरगाव मंजू (जि. अकोला) :    तालुक्यातील लोणाग्रा, कंचनपूर, बदलापूर व अहमदपूर येथील नागरिकांना अकोला येथे ये-जा करण्यासाठी शासनाच्या एसटी बस सेवेचा फायदा गेल्या सात दिवसापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनाचा साहारा घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशावेळी नागरिकांना होत असलेल्या समस्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसहीत विद्यार्थी करीत आहेत.


हेही वाचा - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा
आर्थिक फटका सोसावा लागतो

लोणाग्रा, कंचनपूर, बदलापूर व अहमदपूर गावाला जवळपास आठ गावे जुळले आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने नियमित चालू असलेली एसटी बस सेवा गेल्या सात दिवसापासून बंद आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कंचनपूर येथील स्वं. नागोराव चोरे विद्यालयात जावे लागते. ग्रामीण भाग असल्यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना एसटी बसचा सहारा घ्यावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पासेस काढल्या आहेत. परंतु, फाट्यावर बस न आल्याने काही विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागत आहे.

सहा किलोमीटर यावे लागते पायी
काही विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली असल्याने ते खासगी वाहनाचा सहारा घेतात. पण ज्या विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनांचा खर्च झेपावर नाही अशा विद्यार्थ्यांना माघारी परतावे लागते. नुसतीच परीक्षा तोंडावर येऊन पडली आहे अशा स्थितीमध्ये या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याला कारणीभूत एसटी महामंडळचे अधिकारी व कर्मचारी आहेत. मांजरी गावात बस येत नसल्याने देखील विद्यार्थ्यांना तब्बल सहा किलोमीटर फाट्यावर पायी यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी व वृद्ध प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी महामंडळाने नियमित एसटीबस चालू करण्याची मागणी परिसरातील नागरिक व विद्यार्थी करीत आहेत.

क्लिक करा - वाहतूक सुरळीत करण्यासाठी आता महाट्राफीक अॅप
नियमित एसटी बस सेवा चालू करावी

गेली सात दिवसापासून गावामध्ये एसटी बस येत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वृद्ध प्रवाश्‍यांना देखील सहा किलोमीटर फाट्यावर पायी यावे लागते. आता लवकरच विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होणार आहेत. खासगी वाहन सर्वांना परवडत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नियमित एसटीबस चालू करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे. विद्यार्थ्यांचे काही नुकसान झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरणार असल्याचे विद्यार्थी व पालकांनी सांगितले आहे.

अन्यथा बरणार उपोषणाला
लोणाग्रा-कंचनपूर-अहमदपूर-बदलापूर आणि मांजरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अकोल्याला नियमित ये-जा करावे लागते. परंतु, बस येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. अशा वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित बस चालू करावी. अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल.
-शिवशंकर डिक्कर, उपसरपंच, कंचनपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com