नागपूर : नीटच्या परीक्षेत अगदी शून्य गुण मिळालेल्या विद्यर्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात धाव घेत दाद मागितली आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावून २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागविले आहे. वसुंधरा भोजने असे विद्यर्थिनीचे नाव आहे.
वसुंधरा ही अमरावतीची रहिवासी आहे. तिने दहावीत ९३.४ तर बारावीत ८१.८५ टक्के गुण पटकावले. नीटचा पेपरही चांगला गेला होता. एकूण ७२० गुणांच्या परीक्षेत ६०० हून अधिक गुण मिळतील अशी तिची अपेक्षा होती. पण, १६ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या निकालात तिला शून्य गुण दाखविण्यात आले. तांत्रिक घोळातून हा प्रकार झाला असावा असी तिचा कयास आहे.
निकालाच्या दिवशीच तिने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलद्वरे निवेदन पाठवून चूक दुरुस्तीची मागणी केली. परंतु, कोणताच प्रतिसाद मिळाली नाही. परिणामी तिने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. नव्याने मूल्यांकन करून निकाल जाहीर करावी, तोवर एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी तिची विनंती आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.