Crop Insurance : एकतीस हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण नाही

खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत
Farmers crop insurance
Farmers crop insuranceesakal
Updated on

यवतमाळ : खरीप हंगामात पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत. असे असले तरी तब्बल ३१ हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षणच झाले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दाखल तक्रारींपैकी ५९ हजार तक्रारी नाकारल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे फेरसर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.

यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पीकविमा कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. याबाबत तक्रारी होत्या. ज्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. त्यांचे फेरसर्वेक्षण होणार आहे. पीकविमा काढलेल्या तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

-नवनाथ कोळपकर, कृषी अधिक्षक, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com