मंगरुळपीर (जि.वाशीम) : तालुक्यातील शेलुबाजार येथून जवळ असलेल्या तपोवन येथील गोपाल येवले यांनी एक एकर क्षेत्रात उन्हाळी काकडीची लागवड केली. मात्र, काकडी विक्रीला आल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरू झाला.
परिणामी, बाजारात दर मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकर्यांने काकडीच्या पिकात जनावरे सोडून, पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. उन्हाळी काकडी पिकासाठी गोपाल येवले यांनी 50 हजार रुपये लागवड खर्च केला होता. मात्र, हा लागवड खर्च सुद्धा वसूल झाला नाही. येवले यांना काकडीच्या पिकापासून अंदाजे दोन लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांचा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व महानगरे व शहरे ठप्प झाली आहेत.
अशा स्थितीतही शेतकरी जगाचे पोट भरण्याकरीता शेतात राबराब राबतो आहे. तरीही शेतकर्याच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादीत माल विकण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांना आधार देऊन विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन, त्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.