Two farmer deaths in 24 hours in Vidarbha
esakal
Back-to-back farmer deaths in Gondia and Amravati raise serious concerns over debt burden and rural economic instability : राज्यातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या २४ तासांत विदर्भात दोन शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे ५२ वर्षीय तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे ४६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवरील संकट कधी संपणार? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.