Vidarbha : सरकारचे धोरण, शेतकऱ्यांचे मरण

भूमिपूत्र शेतकरी संघटनेकडून आक्रोश पदयात्रा
Vidarbha
Vidarbhaesakal

रिसोड : सरकारच्या सातत्यपूर्ण शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भूमिपूत्र शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात दिनांक ३१ डिसेंबरला रिसोड येथील संत अमरदास बाबा संस्थान येथून सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांच्या अक्रोश पदयात्रेला सुरवात होणार आहे.

Vidarbha
Pregnancy Tips : हिवाळ्यात गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी; जाणून घ्या

सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ ला नव्या वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदयात्रा पोहोचणार आहे. ३१ डिसेंबरला सांयकाळी रिठद पोचल्याबरोबर स्टँडवर जाहीर सभा होणार असून रिठद येथे मुक्काम यात्रेचा मुक्काम असणार आहे. १ जानेवारी २०२४ ला सकाळी ७.३० ला रिठद येथील गजानन महाराज मंदिरापासुन पुन्हा यात्रेला सुरुवात होईल.

Vidarbha
Insurance Tips तुमचा क्लेम मिळवणं आहे तुमच्याच हाती! कसे ते वाचा.....

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत सभा/ घोषणा आणि जागर करीत अक्रोश पदयात्रा निघणार असून जिल्हाअधिकारी कार्यालय वाशीम येथे निवेदन देऊन जमा झालेल्या सोयाबीनची होळी करून जाहीर सभेनंतर अक्रोश पदयात्रेचा समारोप होईल. शेतकरी पदयात्रेतील सोयाबीनचे भाव सरकार ने पाडले. सोयाबीन आणि सोयापेंड आयात केली जात आहे. परीणामी सोयाबीन चार ते साडेचार हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. लावलेला खर्च सुध्दा वसूल होत नाही. म्हणून प्रत्येक शेतकरी एक-एक मुठ सोयाबीन जमा करून मातीमोल विकल्या जाणाऱ्या सोयाबीनची होळी करणार आहेत.

Vidarbha
Travel Tips : ग्रुपसोबत ट्रीपला जाताना ‘या’ छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा

पदयात्रेकरूंच्या मागण्या

सोयाबीनला आठ हजार रू. भाव द्या.

कापसाला दहा हजार भाव द्या.

तूर आयात बंद करून तुरीचा हमी भाव दहा हजार करण्यात यावा.

कांदा व गव्हाची निर्यात पुन्हा सुरू करण्यात यावी व भाव पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न करू नयेत.

पीक विमा अग्रीमसह नियमित पीक विम्याचा मोबदला द्यावा. कृषी पंपाला मोफत व मुबलक विज पुरवठा द्यावा. शेतकऱ्यांवर दाखल विज चोरीचे गुन्हे सरकार ने तात्काळ मागे घ्यावे, राज्यातील सर्व दुष्काळसदृश घोषित भागात सरसकट मदत द्यावी.

कापसाचे भाव सरकारने पाडले

कापूस आयात केला जात आहे. तुरीचे भाव सरकारने पाडले. बाहेर देशातील तूर आयात करीत आहेत. एक महिन्याआधी चौदा हजार रूपये क्विंटल विकली जाणारी तूर शेतकऱ्यांच्या घरात तुरीचा माल यायला सुरुवात झाली आणि तुरीचे भाव पाच हजार रूपयावर आले. पीक विमा/ अतिवृष्टीग्रस्त/ तथा दुष्काळसदृश सर्व शेतकऱ्यांनाही पीक नुकसानीची मदत नाही. महावितरणचा शेतकऱ्यांची पीळवणुक करणारा याच कारभाराविरोधात शेतकऱ्यांची आक्रोश पदयात्रा निघणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com