Tribal Rights: मेळघाटातील ४० हून अधिक गावांचे पावसाळ्यात रस्त्यांमुळे संपर्क तुटतो. दुरुस्ती न झाल्याने संतप्त नागरिकांनी चिखलफेक आंदोलन केले. सत्तर वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था कायम असून आदिवासी बांधवांनी शासनाकडे लक्ष वेधले.
चिखलदरा : पावसाळ्याच्या दिवसांत मेळघाटातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था होते व तब्बल चाळीस गावांचा संपर्क तुटतो. तालुक्यातील या गावांचे रस्ते चिखलमय झालेले आहेत. वाहने चालवणे कठीण होते.