अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला असून तब्बल २०८ बोगस महिला मतदार आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही संख्या २०० नव्हे तर तब्बल २,००० महिलांना बोगस मतदानासाठी अंबरनाथमध्ये आणण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष Gulabrao Karanjule यांनी केला आहे. करंजुळे यांनी आरोप केला की मुंब्रा, भिवंडी आणि मालेगाव येथून बोगस महिला मतदार अंबरनाथमध्ये आणण्यात आल्या. '२०० नाही तर दोन हजार लोकांना मतदानासाठी आणलं गेलं आहे,' असा दावा करत त्यांनी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान, पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही करंजुळे यांनी दिला आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचे जे आरोप करण्यात येत आहेत, ते त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. या प्रकारामुळे Ambernath शहरातील राजकीय वातावरण तापलं असून प्रशासन पुढे काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.