Ramdas Kadam यांच्या कोने जाळून घेतलं की तिला जाळलं? Anil Parab यांची मागणी, वातावरण पेटलं | Sakal News

UBT Vs Shinde Shivsena: दसरा मेळाव्यानंतर राज्यात राजकीय वादाला तोंड; रामदास कदम यांच्या “बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह ठेवण्यात आला आणि हाताचे ठसे घेण्यात आले” या विधानाने खळबळ; उद्धव ठाकरे गट आक्रमक, तर आता कदमांच्या पत्नीच्या मृत्यूचा मुद्दाही तापला, “तिने स्वतःला जाळलं की तिला जाळण्यात आले?” या चर्चेने रंग..

ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचा दसरा मेळावा संपन्न झाला. मात्र या मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी धक्कादायक खुलासा करताना म्हटलं की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले." कदमांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. यानंतर ठाकरेंच्या गटातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कदमांवर जोरदार टीका केली. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर आता रामदास कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूचा मुद्दा देखील तापला आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चांमध्ये “रामदास कदम यांच्या पत्नीने आत्महत्या केली की तिला जाळण्यात आलं?” या प्रश्नावरून चांगलाच वाद रंगू लागला आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष नव्या टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com