श्री क्षेत्र नारायणगड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, मनोहर वारे मारहाण प्रकरणामुळे या वादाला अधिकच उधाण आले आहे. या प्रकरणात सत्यवान महाराज लाटे यांनी थेट नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सत्यवान महाराज लाटे यांचा दावा आहे की, मनोहर वारे याला पुढे करून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला. मनोहर वारे सतत म्हणत होता, ‘तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, नारायणगड माझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांत तो संभाजी महाराज यांचं नाव घेत होता, असा आरोप लाटे महाराजांनी केला आहे. या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या तपोभूमी संस्थानातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी सत्यवान महाराज लाटे यांच्यावरच मारहाणीचे आरोप करण्यात आले होते, मात्र आता त्यांनीच उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्यावर गंभीर आरोप करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.