मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जपून वाढवलेल्या केळीच्या झाडांचे वादळात भुईसपाट होऊन अतोनात नुकसान झाले आहे. गिरगाव येथील महिला शेतकरी शीलाबाई नादरे यांनी सरकारकडे मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. "माझ्याकडे आता गळ्यातील मंगळसूत्र सोडून काहीच शिल्लक नाही, मदत न मिळाल्यास या केळीच्या बागेत आत्महत्या करण्याची वेळ येईल," अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. अश्रूंना वाट मोकळी करत शीलाबाई नादरे यांनी आपली व्यथा मांडली. गिरगाव परिसरातील केळी बागेची गंभीर परिस्थिती आणि शेतकऱ्यांची दुर्दशा प्रत्यक्ष पाहून आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.