महायुतीत खरंतर अंतर्गत कुरघोडीचंच राजकारण जास्त रंगताना दिसतंय. कारण, राज्याच्या राजकारणात जरी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रितरित्या सत्तेत असले तरी जिथे जिथे श्रेयवाद येतो तिथे भाजप अग्रेसर पाहायला मिळतंय. मग ते जरांगेंचं आंदोलन असो वा ओबीसी नेत्यांचे मुद्दे असतील. शिष्टाईत सगळीकडे भाजपचे नेतेच पुढे आहेत कारण त्याचं श्रेय भाजपला हवंय आणि भाजपची हीच चाल आता शिंदे आणि अजितदादांनी ओळखलेली दिसतेय. त्यामुळेच की काय, अजितदादांनी भाजपचा बालेकिल्ला आणि संघांचं मुख्य कार्यालय असलेल्या राज्याच्या उपराजधानी नागपुरात पक्षाचं चिंतन शिबिर आयोजित केलं होतं. खरंतर आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने हे चिंतन शिबिर आयोजित केलं होतं. पण, या शिबिराच्या पहिल्याच सत्रात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच मंत्र्यांना थेट खुर्ची खाली करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. पण, पक्षाच्या हायकमांडवर ही वेळ का आली, याचेही चिंतन होण्याची गरज आहे. सत्तेमुळे मंत्र्यांच्या भोवती गर्दी होत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मतदारसंघाबाहेर पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक पालकमंत्री नेमून दिलेल्या जिल्ह्यात जायलाही तयार नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीचे श्रेष्ठी व्यूहरचनेत कमी पडली की पक्षवाढीत मंत्र्यांना रस नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.