मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सरकारने उपसमिती गठीत करण्याची घोषणा केली असली तरी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलक नेत्यांनी सरकारवर थेट टीका करताना म्हटलं की, “आमचं म्हणणं सरकारच्या डोक्यात जात नाही. सरकार किडे पडल्यासारखं वागायला लागलं आहे. उपसमिती गठीत करणं म्हणजे काही नवीन नाही, ते जुनेच खेळ आहेत.” नेत्यांनी स्पष्ट मागणी केली की, सरकारने यापूर्वी काढलेल्या सगेसोयरेच्या आधिसूचनेची अंमलबजावणी तातडीने करावी. दिशाभूल करणारे निर्णय घेऊन मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न थांबवावा, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ते पुढे म्हणाले, “आमच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी बैठक घ्या. बाकीचं ऐकण्यात आम्हाला रस नाही. जर सरकारने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्ही मोठ्या संख्येने मुंबईत आंदोलनासाठी धडकणार आहोत.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.