सांगलीच्या Harshal Patil ने का संपवलं जीवन? शासनाकडे कोटींचे बिलं थकीत होती? | Sakal News
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील युवक आणि अभियंता हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल यांचे शासनाकडे जलजीवन योजनेतील तब्बल 1.4 कोटी रुपयांची थकित बिले होती. ही कामं पूर्ण करून सुद्धा शासनाकडून निधी न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली होते. हर्षल यांच्या आत्महत्येपूर्वीचे काही शब्द समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्यांनी म्हटलं होतं. "शासन पैसे देत नाही.. वडिलांना काय सांगू?" या वाक्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ठेकेदार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण माहिती ‘सकाळ’च्या या विशेष व्हिडिओत पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.