आज सकाळची ९.३० ची वेळ मुंबईला कामासाठी निघालेल्या त्या सहा जणांवर काळ म्हणून आली. कसाऱ्याहून सीएसएमटीला निघालेली आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे निघालेल्या लोकल दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घासल्या गेल्यानं अपघात घडला. यावेळी दोन्ही लोकलच्या फूटबोर्डवर प्रवासी उभे होते, तेही एकमेकांना धडकल्यानं खाली रेल्वे रुळावर पडले, आणि यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात तीन महिला आणि तीन पुरूषांचा मृत्यू झालाय. तर ८ ते १० जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकल जवळून गेल्यामुळे दारात लटकत उभे असणारे प्रवाशी एकमेकांना घासले गेले अन् त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते प्रवाशी रूळावर पडले. दोन्ही लोकलच्या दारात उभे असणारे १० ते १२ प्रवाशी रेल्वे रूळावर पडले. काही जणांची पाठ सोलली गेली. डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे रेल्वे रूळावर जिकडे तिकडे मृतदेह अन् रक्तच दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.