पंढरीच्या आषाढी वारीतील 'या' तीन गोष्टी जाणून तुम्हीही थक्क व्हाल..

वारीतील 'या' तीन गोष्टी अजूनही कुणाला माहित नाहीत.. काय आहेत त्या?
Dr. sadanand more said history of pandharpur wari in wari unplugged
Dr. sadanand more said history of pandharpur wari in wari unpluggedsakal

ashadhi wari 2022 : पंढरीची वारी. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय.. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. ही वारी काही आजची नाही. गेली हजारो वर्षे या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला लाखों वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जात आहेत. पण या वारीत तीन गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही आपल्याला माहीत नाहीत, त्याच्या विषयी जाणून घेऊया.. खाली दिलेल्या तीन भागांमध्ये आपण याचा आढावा घेतला आहे..

वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र संप्रदाय असला तरी तो भागवत धर्माचे पालन करणारा आहे. पण भागवत धर्म म्हणजे नेमकं काय हे याविषयी अनेक विचार मांडले जातात. कुणी म्हणतं भागवत म्हणजे भगवान मानणारा धर्म तर कुणी म्हणतं भगवान विष्णु यांना प्रमाण मानणारा धर्म म्हणजे भागवत. पण भागवत म्हणजे नेमकं काय आणि संत ज्ञानेश्वर यांनी सांगितलेलं अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय याविषयी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे सकाळ unplugged मध्ये सांगितले आहे. ते ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (ashadhi wari 2022) (Dr. sadanand more said history of pandharpur ashadhi wari in wari unplugged) (Dr. sadanand more said history of pandharpur wari)

संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराज त्याचे कळस झाले असे म्हंटले जाते. वारीची ही परंपरा हजार वर्षे जुनी आहे. वारकरी संप्रदाय हा काळानुसार वाढलाही आणि समृद्धही झाला. आज लाखों वारकरी त्या संप्रदायाचे आचरण करतात. पण या संप्रदायात यायचे असले तर तुळशीची माळ घालणे गरजेचे आहे. हीच माळ विठ्ठलाच्याही गळ्यात घातली जाते. पण प्रश्न पडतो तुळसच का, काय आहे या तुळशीत ज्याला वारकरी संप्रदायात इतके महत्व आहे. याचाच उलगडा डॉ. सदानंद मोरे यांनी वारी unplugged मध्ये केला आहे. वारकरी संप्रदायातील ही महत्वाची बाब ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.. (Dr. sadanand more said why wear tulasimala in Warkari sampraday in wari unplugged)

वारकरी संप्रदाय वाढला ते त्यातील समता भावामुळे. सर्व धर्म, जाती एक होऊन या संप्रदायात मिसळल्या आणि ही वारी वृद्धिंगत होत गेली. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायात मुस्लिम बांधव ही एक होऊन पांडुरंगाच्या गजरात तल्लीन होतात. एवढेच नाही तर मुस्लिम संत 'जैतूनबी' यांनीही वारकरी संप्रदायाचा मार्ग स्वीकारला. त्यांचीही दिंडी या वारीत सामील होते. पण ही परंपरा आजची नाही. गेली कित्येक वर्ष वारीने हिंदू मुस्लिम ऐक्य साधले आहे. ते कसे हे जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जरूर क्लिक करा..

या भागात तुम्हाला केवळ वारीच नाही तर वारकरी संप्रदाय, तो का आणि कसा वाढला, वारकरी संप्रदायाने समाजाला कोणती महत्वाची देणगी दिली याचीही माहिती संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी उलगडली आहे. यासह वारीतील अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, काही गमतीजमती, परंपरा त्यांनी 'वारी unplugged ' या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहे. वारी सुरु होण्यापासून ते आषाढी एकदशी पर्यंतचा प्रवास विविध भागांमधून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तेव्हा वारीची ही दिव्य परंपरा आणि आपला इतिहास जाणून घेण्यासाठी 'वारी unplugged' हा कार्यक्रम नक्की ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com