
गरोदरपणात सामान्यपणे स्त्रीला थकवा, झोपाळूपणा, अशक्तपणा व कोणतेही काम करण्यास निरुत्साह जाणवू शकतो. लघवीला अनेकदा जावे लागणे, मळमळणे व उलट्या, रक्तशर्करेची बदलती पातळी ही काही कारणे आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता पुढची बघू या.
गरोदरपणात सामान्यपणे स्त्रीला थकवा, झोपाळूपणा, अशक्तपणा व कोणतेही काम करण्यास निरुत्साह जाणवू शकतो. लघवीला अनेकदा जावे लागणे, मळमळणे व उलट्या, रक्तशर्करेची बदलती पातळी ही काही कारणे आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता पुढची बघू या.
हायपोटेन्शन
गरोदरपणात स्त्रीचा रक्तदाब इतरांपेक्षा कमी होतो. कारण गरोदरपणात मातेच्या हृदयाकडून पोटातील बाळाकडे रक्तप्रवाह अधिक प्रमाणात वाहतो. रक्तदाब कमी होण्याबरोबरच डोकेदुखी, आळस येणे, मोठ्या प्रमाणावर घाम येणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे अशा समस्या येऊ शकतात. रक्तदाबाची पातळी सुरळीत राखण्यासाठी पाणी व द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शरीरात होणारे बदल
गरोदरपणादरम्यान स्त्रीच्या शरीरात अचानक वजन वाढणे, हात व पायांवर सूज येणे, आठव्या व नवव्या महिन्यात पोटाचा घेर वाढणे, असे अनेक बदल होतात. त्यामुळे तिच्या पाठीच्या कण्यावर आणि शरीरावर मोठा ताण पडतो. त्यामुळे हालचालीही मंदावतात.
जीवनसत्त्वांची कमतरता
अशक्त असलेल्या आणि रक्तातील हिमोग्लोबिन कमी असलेल्या स्त्रियांना जीवनसत्वांची कमतरता जाणवते. महिलांच्या रक्तात किमान दहा ग्रॅम हिमोग्लोबिन गरजेचे असते. गरोदरपणाच्या काळात हे प्रमाण राखण्यासाठी लोहाच्या गोळ्या घेणे आवश्यक आहे. या गोळ्यांचे ॲसिडिटी आणि उलट्या असे दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात औषध घेतल्यास; तसेच लिंबूपाणी घेत राहिल्यास ही समस्या कमी होते. बी १२ जीवनसत्वाच्या अभावामुळे अशक्तपणाची समस्या येऊ शकतात. स्नायू ताणले जाणे, झोपाळूपणा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी बी १२ जीवनसत्त्व घेण्याची गरज असते. गरोदरपणाच्या काळात सांधेदुखी व तळपायातील वेदनांमुळे स्त्रीला त्रास होऊ शकतो. गुडघे व मनगटांमध्येही वेदना होऊ शकतात. अशावेळी ड जीवनसत्वाची पातळी तपासणे आवश्यक असते. मातेच्या शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी ड जीवनसत्वाची गरज असते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हे उपाय करा
Edited By - Prashant Patil