सोशल मीडियाच्या वापरातला एक मोठा धोका म्हणजे सोशल मीडिया आणि एकुणात त्याच्यामुळं मोबाईलचं व्यसन लागणं. दिवस-रात्र सतत आपल्या मोबाईलमध्ये मान घालून बसलेली खूप माणसं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असतील. देशात सध्या ३८ कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. कदाचित तुम्ही स्वतःही असं करत असाल! हल्ली बहुसंख्य लोक सकाळी उठल्या उठल्या करत असलेली पहिली गोष्ट म्हणजे, मोबाईलमध्ये डोकावून व्हाॅट्सॲपवर काय आलंय, फेसबुकवर काय झालंय, इन्स्टाग्रामवर कोणी काय पोस्ट केलंय, आपल्या कालच्या पोस्टला किती लाइक मिळाले आहेत, हे सगळं सगळं अत्यंत कंपल्शन असल्यासारखं तपासून बघतात! त्याचबरोबर दर काही मिनिटांनंतर कुठं काय घडतंय, काय होतंय, काय चाललंय हे दिवसभर बघत राहायची लोकांना सवय लागली आहे.
आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला असलेली खरी माणसं यांच्याशी खराखरा संवाद साधायचा सोडून, सतत आभासी जगातल्या आभासी माणसांबरोबर सुरू असलेला संवाद आपल्याला जास्त आवडायला लागला आहे, त्याचं आपल्याला व्यसन लागायला लागलं आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. सोशल मीडियाद्वारे आपण अनेक लोकांशी जोडले जाऊ शकणं हे अत्यंत जादुई आणि महत्त्वाचं आहे, हे खरंच, ते करताना खऱ्या आयुष्यातल्या खऱ्या माणसांबरोबर नाती आपण सांभाळू शकत नसू आणि त्यात दुरावा निर्माण होत असेल, तर या आभासी जगाचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा आणि दूरगामी परिणाम होईल. असा होऊ नये, असं वाटत असल्यास सोशल मीडियाच्या अधीन होऊन, वाहवत जाऊन स्वतःच्या आयुष्यातल्या खऱ्या नात्यांपासून आपण दूर जात नाही आहोत ना, हे सतत तपासून बघणं गरजेचं असतं.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
व्यसन लागू नये म्हणून
यासारखे काही नियम आपण करायला लागलो तर आपण स्वतः मोबाईल आणि सोशल मीडियाच्या व्यसनापासून दूर जायला लागूच आणि आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींनाही हे करायला आपण मदत करू शकू. करून बघा.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.