पुलवामानंतर काश्मिरी तरुणांचे लष्कर भरतीसाठी 2500 अर्ज

army-recruitment
army-recruitment

बारामुल्ला -  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्येही बदलाचे वारे आहे. बारामुल्ला येथे नुकतीच भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरु केली. आणि काश्मिरी तरुणांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. यावेळी 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.

काश्मिरमध्ये आम्हाला नोकरिच्या फार कमी संधी आहेत. लष्करात भरती झाल्याने आम्हाला देशसेवेची संधी तर मिळणारच आहे, शिवाय आमच्या कुटुंबाची सुरक्षा आम्ही करु शकतो सोबत काळजीदेखील घेऊ शकतो. असे यावेळी भरतीसाठी आलेल्या एका तरुणाने सांगितले.

दुसऱ्या तरुणाने सांगितले, काश्मीरच्या बाहेर जाणे आम्हाला शक्य नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आम्हाला जास्तीत जास्त नोकऱ्यांची संधी दिली जावी अशी अपेक्षा आहे. जर काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केले तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com