'गेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही'(व्हिडिओ)

'गेल्या वर्षी एकाने केली; यंदा किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही'(व्हिडिओ)

बीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत 50 हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.



जिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी (ता. 06) जिल्ह्यात आले. दुपार नंतर रेवली (ता. परळी) येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चंद्रकांत कांदे यांनी शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल व्यथित केले. तर, सरपंच मनोहर केदार यांनी दुष्काळामुळे किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही अशी भीती व्यक्त केली.



गावातील पाणी योजना बंद असून प्यायला पाणी नाही असे सांगत टँकरचा प्रस्ताव पाठविल्याचे केदार म्हणाले. यावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करु, असे सांगीतले. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा पथकात समावेश होता. पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे रांजणकर होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com