खान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड !

खान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड !

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात  बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाचे महत्त्व कायम आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करून तमाशा कलावंताच्या आयुष्याच्या शेवटी हलाखीचे जीवन जगावे लागते. यासाठी शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी खान्देशातील वीस छोट्या  तमाशा मंडळाची आजही धडपड सुरू असल्याची खंत तमाशा मालक नामाभाऊ अंजाळेकर यांनी वडगाव लांबे (ता. चाळीसगाव)येथे 'सकाळ' शी बोलतांना व्यक्त केली.

अंजाळे( ता.यावल जि.जळगाव) येथील नामाभाऊ यांचा  लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम नुकताच वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथे झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या तमाशा मंडळांना दुष्काळी परिस्थीतीचा फटका बसत आहे. ज्या गावांना यात्रा निमित्ताने  कार्यक्रम करायचा तेथे 50 हजार रूपये मिळायचे.परंतु  आज त्या ठिकाणी25 हजारावर आम्हाला समाधान मानावे लागत आहे.

अनुदानासाठी धडपड
तमाशा मंडळाना शासनाकडून आठ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येते.गेल्या अनेक वर्षापासून या  पॅकेजपासून तमाशा मंडळे  वंचित आहेत. पाठपुरावादेखील सुरू आहे. तरीही काही वेळा निधी शिल्लक नसल्याचे कारण पुढे करण्यात येत असते. खान्देशातील वीस लहान तमाशा मंडळे असुन या सर्वांची अनुदानासाठी धडपड सुरू आहे. आठ लाखाचे पॅकेज शासनाने  तमाशा मंडळांना दिले, तर नक्कीच कलावंताच्या गरजा भागविण्यास मोठी मदत होईल. तमाशातील सर्व कलावंतांना दरमहा मानधन मिळावे, कलावंत साठ वर्षांचा झाल्यानंतर त्याला पेन्शन देण्यात यावे. तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी सरकारने जर शाळा सुरू केल्या तर आमची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत,आशी खंत नामाभाऊ यांनी व्यक्त केली.

चाळीस कुटंबाचा पोशिंदा...
नामाभाऊ अंजाळेकर याच्या तमाशा मंडळात चाळीस कलाकार वेगवेगळ्या गावाचे आहेत. या सर्वांचे कुटुंब आज नामाभाऊ यांच्यावर आठ महीने आवलंबुन असते.त्यामुळे आज तमाशा कार्यक्रमातुन मिळणाऱ्या मोबदल्यात चाळीस कुंटबांचा उदरनिर्वाह करीत आहे.बर्याच वेळी तमाशात आता बदल होत चालला आहे. नाईलाजास्तव महीलांना स्टेजवर नाचवावे लागते.आनेकदा काही गावांमध्ये महिलांची देखील खोडी काढतात तर अक्षरश दगड देखील मारतात बर्याच वेळा विरोध केला तर तमाशाचे साहीत्य मोडतोड करतात अश्या अनेक गोष्टीना आम्हाला सामोरे जावे लागते.घराची हलाखीची असल्यानेच आमच्या तमाशा कलावंताच्या आयुष्याचाच तमाशा झाला आहे.

शेतकरी आत्महत्यावर प्रबोधन
वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथे नामाभाऊ अंजाळेकर यांनी तमाशातील रंगबाजी झाल्यावर शेतकरी आत्महत्या हे वगनाट्य सादर केले.यावर प्रबोधन केले. शेतकर्यांनी  वगनाट्य संपेपर्यंत ऐकले.येथील ग्रामपंचायती कडुन उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच मानसिंग पाटील, पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी नामाभाऊ यांचा सत्कार केला. 

शासनाच्या अनुदानासाठी आम्हाला आजही पंचवीस गावात कार्यक्रम करावा लागतो.त्यानंतर तेथील गावातील ग्रामपंचायतीचा दाखला घ्यावा लागतो.या अश्या दुष्काळी परिस्थितीत शासनाने तमाशा मंडळाना मदत करावी. तसेच काही अटी देखील शितल कराव्यात.
- नामाभाऊ अंजाळेकर, लोकनाट्य तमाशा मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com