जानेवारीतच 29 गावांत टॅंकर

File photo
File photo

अमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत असून ते पर्याप्त नाही. नागरिकांसह जनावरांनाही पिण्यासाठी पाणी पुरत नसल्याने बुलडाण्यातील काही गावांतील नागरिकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात 2146 गावे टंचाईग्रस्त असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
विभागातील अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील अनुक्रमे 973 व 629 गावे टंचाईग्रस्त आहेत. अमरावती जिल्ह्यातील एक व बुलडाण्यातील 28 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आठवड्यातून एक दिवस गावात टॅंकर येतो. लोकसंख्येच्या तुलनेत तो अपुरा पडत असल्याने तहान भागत नाही. मनुष्याला पिण्यासाठी पाणी नाही, तेथे जनावरांना कुठून पुरवायचे, असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे. परिसरातील विहिरी, नद्या, नाले आटले असून धरणांमधील साठाही झपाट्याने कमी होत आहे. एका मोठ्या धरणासह तीन मध्यम व 55 लघु प्रकल्पांतील जलसाठा संपला आहे.
प्रशासनाने पूरक योजना सुरू केल्या असल्या तरी त्या पुरेशा नाहीत, असे गावकऱ्यांचे मत आहे. पाण्यासोबतच चाऱ्याचीही टंचाई असल्याने स्थलांतराच्या मानसिकतेत नागरिक आले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com