उत्तरप्रदेश, झारखंड, बिहारमध्ये वादळाचा तडाखा ; 34 जणांचा मृत्यू

34 killed in thunderstorms across UP Jharkhand Bihar monsoon hits Kerala
34 killed in thunderstorms across UP Jharkhand Bihar monsoon hits Kerala

तिरुअनंतपुरम : देशातील काही राज्यातील नागरिकांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. झारखंड, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये 48 तासांहून अधिक तास वादळाने थैमान घातले आहे. या वादळामुळे आत्तापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

झारखंडमध्ये 12, बिहारमध्ये 12 तर उत्तर प्रदेशमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. दाक्षिणात्य भाग असलेल्या केरळमध्ये अपेक्षित कालावधीपूर्वीच मान्सून येणार असल्याने या वादळाचा तडाखा बसत आहे. बिहारमधील पेखा गावात झाड कोसळल्याने येथील तिघांचा मृत्यू झाला. परिसरात बचावकार्य सुरु करण्यात आले असून, जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. तसेच झारखंडमधील काही भाग या वादळाचा बळी ठरला आहे. झारखंडमधील 12 जणांचा मृत्यू झाला. 

लक्षद्वीपच्या अमिनी येथे 24 मिमी तर केरळच्या कोन्नी येथे 18 मिमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. तसेच आता बदलत्या हवामानामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे विभागीय संचालक के. संतोष यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com