पिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम 

पिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम 

गुडगाव (वृत्तसंस्था) : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जमिनीतील पिकांचे अवशेष नष्ट करण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक साह्य मिळत नसल्याचा दावा करीत पिकांचे अवशेष जाळण्याशिवाय पर्याय नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

हरियाना आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष जाळल्यामुळे या दोन राज्यांसह दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार धरत हरियाना आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना पिकांचे शेतातील अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. पिकांचे अवशेष जाळण्यावर सरकारने बंदी घातली आहे; मात्र त्या बदल्यात शेतातील अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
पंजाबमध्ये शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याच्या 330 घटना, तर हरियानात 701 घटना समोर आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भातपिकाचे अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये चालू वर्षी घट झाल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. 

भातपिकाचे अवशेष जाळण्याची शेतकऱ्यांचीही इच्छा नाही. मात्र, यासाठीचा इतर कुठलाही कमी खर्चिक पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध नाही, त्यामुळे इच्छा नसतानाही त्यांना हा निर्णय घेणे भाग पडते. 
- बलबीरसिंग राजेवाल, भारतीय किसान युनियन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com