भारतातील आतापर्यंतचे भीषण रेल्वे अपघात

Railway_Accident
Railway_Accident


20 नोव्हेंबर 2016 : उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील पुखरायण येथे इंदोर-पाटणा एक्‍स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरल्याने 112 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तर 200 हून अधिक जण जखमी.

28 मे 2010 : पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कटात ग्यानेश्‍वरी एक्‍स्प्रेस रुळावरून घसरल्याने सुमारे 148 लोकांचा मृत्यू.

9 सप्टेंबर 2002 : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात धवे नदीत हावडा-दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेसचा डबा बुडून झालेल्या अपघातात 100 ठार, तर 150 हून अधिक जखमी.

2 ऑगस्ट 1999 : आसाममधील गैसल येथे सुमारे अडीच हजार लोकांना घेऊन निघालेल्या दोन रेल्वेगाड्यांची धडक होऊन सुमारे 290 प्रवाशांचा मृत्यू.

26 नोव्हेंबर 1998 : पंजाबमधील खन्ना येथे फ्रंटियर मेलच्या घसरलेल्या डब्यांवर जम्मू तावी-सील्डाह एक्‍स्प्रेसची धडक बसून सुमारे 212 लोकांचा मृत्यू.

14 सप्टेंबर 1997 : मध्य प्रदेशमधील विलासपूर जिल्ह्यात अहमदाबाद-हावडा एक्‍स्प्रेसचे पाच डबे नदीत कोसळल्याने 81 जणांचा मृत्यू.

20 ऑगस्ट 1995 : उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद रेल्वे स्थानकाजवळ पुरुषोत्तम एक्‍स्प्रेसने कालिंदी एक्‍स्प्रेसला दिलेल्या धडकेत 400 जणांचा मृत्यू.

18 एप्रिल 1988 : उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे कर्नाटक एक्‍स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 75 जणांचा मृत्यू.

8 जुलै 1988 : केरळमधील अश्‍टमुंडी तलावात आइसलॅण्ड एक्‍स्प्रेस पडल्याने 107 जणांचा मृत्यू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com