नोटाबंदीनंतरही देशात लाचखोरी कायम !

Bribe
Bribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैशाला लगाम बसेल असे सांगितले जात होते. मात्र, नोटाबंदीनंतरही देशात लाचखोरी कायम असून, मागील वर्षी देशातील 45 टक्के लोकांनी लाच दिल्याची बाब एका सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे.

'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेने देशातील 11 राज्यांमध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. देशातील 34 हजार 696 लोकांपैकी 37 टक्के लोकांनी देशात भ्रष्टाचार वाढल्याचे सांगितले. यामध्ये मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील 71 टक्के लोकांनी या राज्यांमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचे सांगितले. तर महाराष्ट्रातील 18 टक्के लोकांनी राज्यात भ्रष्टाचार वाढल्याचे सांगितले. याशिवाय 14 टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाल्याचे सांगितले.

"पोलिस, नगरपालिका, कर संकलन विभाग, विद्युत विभाग आणि मालमत्ता नोंदणी कार्यालये आदी ठिकाणी भ्रष्टाचाराची 84 टक्के प्रकरणे घडली आहेत. तसेच देशात वर्षभरात 9 टक्के लाच ही केंद्र सरकारच्या विभागांना देण्यात आली आहे'', अशी माहिती ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे पंकज कुमार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com