परदेशात गेल्यास 'दुसऱ्या' मोदीला आणा - राहुल गांधी

rahul-gandhi
rahul-gandhi

गुवाहाटी - मेघालयातील निवडणूक प्रचार सभेत राहुल यांनी पीएनबी गैरव्यवहारावरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. यावेळी बोलताना ''पंतप्रधान बऱ्याचदा परदेश दौऱ्यांवर जातात. पुढच्या वेळी ते विदेश दौऱ्यावर जातील, तेव्हा परतताना त्यांनी देशाचा परदेशात पळालेल्या नीरव मोदीलाही बरोबर घेऊन यावे, असे आवाहन राहुल यांनी केले. 

यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांच्यात तुलना देखील केली. नीरव मोदी हिरे विकतो. हिऱ्यांना आपण स्वप्नातील वस्तू म्हणतो. खरे तर त्याने अनेक लोकांची स्वप्ने विकली आहेत. त्यात सरकारही सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले. नीरव मोदी जनतेची कमाई लुटून पळून गेला त्यावेळी सरकार शांत झोपले होते. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय जनतेला स्वप्ने विकली होती. त्यात अच्छे दिनचे स्वप्न होते. सर्वांच्या बँक खात्यात 15लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्यांसह अनेक स्वप्नांचा त्यात समावेश होता,' असा टोलाही राहुल यांनी मोदींना लगावला. 

देशातील जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजपवर 2014च्या निवडणुकांपूर्वी विश्वास ठेवला होता. मोदी नोकऱ्या देतील असे त्यांना वाटले होते. पण या सरकारने आतापर्यंत निराशा, बेरोजगारी, भीती, द्वेष आणि हिंसा याशिवाय काहीच दिले नाही, असेही राहुल म्हणाले.

विजय माल्या आणि नीरव मोदी घोटाळ्यामुळे आपल्याला हे सनजले आहे की हे सरकार घोटाळ्यांना पाठिशीच घालत नाही तर यामध्ये सरकारचा सक्रीय सहभागही असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

याशिवाय कोरनाड संगमा यांच्या नॅशनल पिपल पार्टीला (एनपीपी) मत न देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com