देशात कोठेही मीठाची कमतरता नाही: केंद्र सरकार

देशात कोठेही मीठाची कमतरता नाही: केंद्र सरकार
देशात कोठेही मीठाची कमतरता नाही: केंद्र सरकार

नवी दिल्ली - देशात मीठाची कमतरता असल्याची अफवा पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्‍वमूमीवर केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले असून देशात कोठेही मीठाची कमतरता नसल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना पासवान म्हणाले, "देशात कोठेही मिठाची कमतरता नाही. जे लोक अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी. जे लोक 200 रुपये किलोने मीठ विकत आहेत त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. हे संपूर्णत: चुकीचे आहे. साखर, तांदूळ, गहू किंवा अन्य कोणत्याही पदार्थाची देशात कमतरता नाही.' याशिवाय ग्राहक व्यवहार मंत्रालयानेही कोणत्याही प्रकारची मीठाची अनपेक्षित कमतरता भासली तर त्याला सामोरे जाण्यासाठी मीठाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच "आम्ही प्रमुख 22 वस्तूंच्या किंमतींवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या माहितीनुसार देशात कोठेही मीठाच्या किंमतीत वाढ झालेली नाही' असेही मंत्रालयाने कळविले आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथून शुक्रवारी रात्री मीठाची कमतरता असल्याचा मेसेज पसरविण्यात आला. हा मेसेज वेगाने पसरला. त्यामुळे लोकांनी मीठ खरेदीसाठी दुकानात गर्दी केली. काही ठिकाणी मीठाची पोती चोरीला गेल्याचे घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी मीठाचे भाव 200-400 रुपये प्रतिकिलो असे झाले. अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी रामपूर येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com