मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक(Satyapal Malik) हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन सतत चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या हक्काविषयी बोलताना सत्यपाल मलिक यांनी एक वक्तव्य केले की शेतकऱ्यांना संघर्ष करुनही त्यांचे हक्क मिळाले नाही तर हिंसाचार करुन ते घेईल. या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले.राजस्थानमधील जोधपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते,
सत्यपाल मलिक म्हणाले,”शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी पुन्हा उभा राहील. त्याचबरोबर शेतकरी त्यांचे हक्क मिळवतील, असा इशारा यापूर्वीच केंद्र सरकारला दिलाय. जर शेतकऱ्यांना चर्चेतून त्यांचे हक्क मिळाले नाही तर ते संघर्ष करणार आणि जर त्यांना संघर्ष करुनते मिळाले नाही तर ते हिंसाचाराच्या माध्यमातून घेणार. मी केंद्र सरकारच्या विरोधात नाही, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना दडपता येणार नाही.”
“शेतकऱ्यांना आपला हक्क कसा घ्यायचा हे माहीत आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा शेतकरी आंदोलन सुरू करून शेतकरी आपले हक्क घेणार आहेत.” असेही ते म्हणाले.
राज्यपाल पद गमावण्याची भीती नसल्याचेही सत्यपाल मलिक म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मी कोणालाही घाबरत नाही, असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.