वीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता

वीरप्पनच्या 9 साथीदारांची मुक्तता

इरोड (तमिळनाडू)- दिवंगत कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केलेला चंदन तस्कर वीरप्पन याच्या नऊ साथीदारांची न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी मंगळवारी सुटका केली. त्यांच्यावर ठेवलेले आरोप सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे.

अपहरणाची घटना नऊ वर्षांपूर्वी घडली होती. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे तिसरे न्यायाधीश गोबीचेट्टीपलायम मणी यांनी नऊ जणांच्या सुटकेचा आदेश दिला. वीरप्पनच्या साथीदारांवर ठेवलेल्या आरोपांच्या पुष्ठ्यर्थ फिर्यादी सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत. तसेच, साक्षीदारांची साक्षही त्यादृष्टीने कमकुवत ठरली. त्यामुळे नऊ आरोपींची मुक्तता करण्याचा आदेश दिल्याचे न्या. मणी यांनी सांगितले. या गाजलेल्या खटल्यात 47 साक्षीदारांची तपासणी झाली.

वीरप्पन आणि त्याच्या 14 साथीदारांनी तमिळनाडूतील धोद्दा गजनूर गावातील फार्म हाऊसमधून अभिनेते राजकुमार यांचे 30 जुलै 2000 मध्ये अपहरण केले होते. पश्‍चिम घाटातील जंगलात त्यांना 100 दिवस बंदिवासात ठेवल्यानंतर 108 व्या दिवशी वीरप्पनने त्यांची सुटका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com