वासांबे मोहोपाडातील महावितरण कार्यालय विभाजनाचा प्रस्ताव कागदावरच

Mahavitran
Mahavitran

रसायनी (जि. रायगड) : रसायनीचे मुख्यालय येथील वीज महावितरण वासांबे मोहोपाडा साहाय्यक अभियंता कार्यालय विभाजनाचा प्रस्ताव महावितरणच्या आनास्थामुळे अजुनही दोन वर्षांपासून कागदावर आहे. त्यामुळे मोहोपाडा परीसरातील ग्राहाक महावितरणच्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. दरम्यान कार्यालयाचे विभाजन करण्यात यावे आशी ग्राहकांची मागणी आहे. 

वीज महावितरणच्या सुधारीत धोरणानुसार वीज ग्राहाकांना चांगली सेवा मिळावी त्यासाठी साडेसात हजार ग्राहाक संख्या आसलेल्या सहाय्यक अभियंता कार्यालयाचे विभाजन करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार वासांबे मोहोपाडा येथील कार्यालयातील सहाय्यक अभियंता कार्यालयानेे साधारण दोन वर्षांपूर्वी महावितरणच्या पेण येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात विभाजनचा प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान हा प्रस्ताव पाठविल्या नंतर विभाजन बाबत काहीच हलचाली दिसत नसल्यामुळे महावितरणच्या या निर्णयाच्या विरोधात मोहोपाडा परीसरातील ग्राहक नाराजी व्यक्त करत आहे.

वासांबे मोहोपाडा येथील साहय्यक अभियंता कार्यालयाच्या अंतर्गत वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, बारवाई, पोयंजे, खानावळे या ग्रामपंचयतीच्या हाद्दीतील सुमारे 20 गाव आणी 10 वाडया तसेच पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने मोडत आहे. घरगुती विज ग्राहकांची संख्या दहा हजार आठशे 63 इतकी,  व्यावसायिक संख्या एक हजार 92 इतकी, कारखानदाराची संख्या 92 इतकी आसुन इतर ग्राहकांची संख्या एकशे 77 इतकी आहे. आशी सर्वं मिळुन ग्राहकांची संख्या 12 हजार दोनशे 23 सध्या आहे. असे महावितरणच्या सुत्रातून सांगण्यात आले. 

मोहोपाडा परीसरात नागरिकांना सर्व प्रकाराच्या सुविधा मिळत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तसेच क्षेत्रा बाहेरील कारखान्यात काम करणारे कामगार मोहोपाडा किंवा परीसरातील गावात राहण्यासाठी पसंत करत आहे. त्यामुळे मोहोपाड्याची व शेजारील गावांची लोकलंख्या वाढली आहे. परिणामी विजेची मागणी वाढत आहे. सध्या मोहोपाडा व बाजुच्या गावात अनेक गृह प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात अाजुन लोकलंख्या वाढणार आहे. लोकांना महावितरणन कडुन चांगल्या सुविधा मिळाव्यात त्यासाठी विभाजन झाले पाहिजे अशी ग्राहकांची मागणी आहे. 

कोट-वासांबे मोहोपाडा महावितरण कार्यालयच्या हद्दीत ग्राहाकांची संख्या वाढत आहे. मात्र त्याप्रमाणे कर्मचारी संख्या वाढली नाही, नियोजित नेमणुका पेक्षा कर्मचारी कमी आहे. आपु-या कर्मचा-यामुळे काम वेळेवर होत नाही. विभाजन झाले तर दोन्ही स्वतंत्र कार्यालयात नियमा प्रमाणे कर्मचारी व आधिकारी मिळतील.
- आशिष कवळे, रीस मोहोपाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com