शेतकरी हिताचे संशोधन करा - डॉ. मदनमोहन वार्ष्णेय

शेतकरी हिताचे संशोधन करा - डॉ. मदनमोहन वार्ष्णेय

दाभोळ - राज्यातील कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करतेवेळी पीक उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, हे प्रकर्षाने ध्यानात ठेवले पाहिजे. पीक उत्पादनामध्ये गरजेनुसार सिंचनाची उपलब्धता आणि उत्पादित मालासाठी योग्य बाजारभाव या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते, असे प्रतिपादन कामधेनू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनमोहन चंद्र वार्ष्णेय यांनी केले.

दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये ४६ व्या संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले,  महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांनी खूप चांगल्या प्रकारचे संशोधन करून पिकांच्या विविध जाती तसेच लागवड तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. हे तंत्रज्ञान शेतापर्यंत कसे जाते, किती वेगाने जाते आणि त्याचबरोबर किती प्रभावीपणे जाते यावर या संशोधनाचे यशापयश अवलंबून आहे. उत्पादित मालाची साठवणूक, प्रक्रिया आदी सुविधा गाव समूहामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न झाल्यास उत्पादित मालाचे होणारे नुकसान टाळता येईल.  

डॉ. वेंकटेश्‍वर्लू म्हणाले, संशोधन शिफारशींची संख्या हा निकष न राहता त्या शिफारशींची उपयुक्‍तता, महत्त्व आणि दर्जा यांचा विचार प्रत्येक कृषी शास्त्रज्ञाने केला पाहिजे. सद्यपरिस्थितीचा विचार करता आणि भविष्यकाळाची गरज लक्षात घेता आजवर प्रचलित असलेली संशोधनाची विविध क्षेत्रे आणि संशोधनाचे विषय यामध्ये बदलाची आवश्‍यकता पडताळण्यासाठी स्वतंत्रपणे विचारमंथन होणे महत्त्वाचे आहे. डॉ. भट्टाचार्य यांनी विद्यापीठाने गतवर्षी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com