तर आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल : आमदार नितेश राणे

rane
rane

वैभववाडी : घाटरस्त्यांची स्थिती धोकादायक असुन सामान्य जनता जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे. मात्र मंत्री आणि अधिकारी घाटरस्त्याबाबत अजिबात गंभीर नाही. एखादी दुर्घटना घडल्यानतंर त्यांना जाग येणार असेल तर आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना येथे दिला. निधी आणि घाटरस्त्याच्या देखभाल दुरूस्तीवरून राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

भुईबावडा घाटात शनिवारी पहाटे दरड कोसळली होती तर करूळ घाटात सरक्षंक भिंत कोसळल्यामुळे तेथुन एकेरी वाहतुक सुरू आहे. दोन्ही घाट धोकादायक बनत असल्यामुळे आज (ता.१६) आमदार राणे यांनी करूळ आणि भुईबावडा घाटांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर आदी उपस्थित होते.

करूळ घाटातील सरक्षंक भिंत कोसळलेल्या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हटकर यांना चांगलेच धारेवर धरले. गेल्यावर्षी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या दुरूस्ती संदर्भात चर्चा केली. परंतु त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. शंभर कोटी देतो, एक कोटी देतेा अशा फक्त घोषणा केल्या जातात. निधी येतो तो नेमका कुणासाठी जनतेसाठी कि ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. घाट रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. परंतु अधिका्रयांना त्याच्याशी काहीही देणघेण राहिलेले नाही. एखादी दुर्घटना घडल्यानतंर प्रशासन जागे होईल आणि त्यानतंर आवश्‍यक तो निधी दिला जाईल. मात्र आम्ही तसे होवु देणार नाही. मंत्री आणि अधिकारी जर गंभीर नसतील तर आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी बांधकामचे अधिकारी व्हटकर यांना दिला. एखाद्या अधिकाऱ्यांला ज्यावेळी दुर्घटनेला सामोरे जावे लागेल त्याचवेळी त्यांना सामान्य जनतेचे दुःख कळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यापुर्वी घाटरस्त्याची डागडुजी करणे आवश्‍यक होती. परंतु गटारे तुबंली आहेत. जागोजागी कटडे कोसळले आहेत. अधिकारी म्हणुन तुम्ही काय करताय? तुम्ही यापुर्वी किती वेळा घाटरस्त्याची पाहणी केलात ? असा जाब देखील राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही समर्पक उत्तरे दिली नाहीत.

अधिवेशनात जाब विचारणार
करूळ आणि भुईबावडा हे दोन्ही घाटरस्ते धोकादायक बनले आहेत.या रस्त्याकडे आवश्‍यक त्या गंभीरतेने पाहीले जात नाही.त्यामुळे यासंदर्भात अधिवेशनात जाब विचारून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार श्री.राणे यांनी स्पष्ट केले.

करूळ घाटात सरक्षंक भिंत कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेल लावुन  एकेरी वाहतुक सुरू केली आहे.हा रस्ता आणखी खचु नये म्हणुन बांधकाम विभाग अन्य काही पर्यायी उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे.मात्र सध्या मुसळधार पावसामुळे कोणतेही काम करणे शक्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com