उद्धव ठाकरेंना आता तरी जाग येणार: किरीट सोमय्या

Kirit Somaiya
Kirit Somaiya

मुंबई : गुजरातच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षात एकत्र असूनही सतत भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला चिमटा काढताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आता तरी जाग येणार का असा प्रश्न केला आहे.

गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून, भाजपने 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेकडून सतत भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच एक्झिट पोलचे आकडे पटले नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी राहुल गांधींचे कौतुकही केले होते. 

याच मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनाला आत्ता तरी जाग येणार का? जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com