शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकारला घेरणार 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकारला घेरणार 

मुंबई - येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर फडणवीस सरकारला घेरण्याचा निर्णय कॉंग्रेसने आज घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची आज दुपारी विधानभवनातील कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे आदी उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये प्रामुख्याने अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील ज्वलंत समस्या, अधिवेशनातील संभाव्य मुद्दे व चर्चेचा प्राधान्यक्रम, तसेच विविध आघाड्यांवर सरकारचे अपयश आदींबाबतही या वेळी विचारविनिमय करण्यात आला. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, बोंड अळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्याने होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषय या अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com