"कुठल्याही पॅटर्नच्या अभ्यासाची गरज नाही' 

"कुठल्याही पॅटर्नच्या अभ्यासाची गरज नाही' 

मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येते, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का देत नाही, असा सवाल विचारत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. ""योगी आदित्यनाथ हे पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तुम्ही तर गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री आहात मग तुम्हाला कर्जमाफी देण्यास काय अडचण आहे,' असा सवाल अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला; तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही पॅटर्नचा अभ्यास करण्याची काही आवश्‍यकता नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केले. 

सर्व विरोधी पक्षांतील नेत्यांनी एकत्रितरीत्या कर्जमाफीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, सुनील तटकरे हे नेते या वेळी उपस्थित होते. 

उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले, त्या प्रमाणे महाराष्ट्रात कर्जमाफी नको, असे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. पाच एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असावी, असे ते म्हणाले. सरकार हे शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

शेतकऱ्यांशी या सरकारला काही सोयरसुतक नसल्याची टीका अजित पवारांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही पॅटर्नचा अभ्यास करण्याची काही आवश्‍यकता नाही, असे राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केले. ""महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव तुम्हाला हवी. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत आवश्‍यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही त्यामुळे त्यांना कर्जमाफीची आवश्‍यकता आहे,'' असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com