शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना शिक्षा

crime
crime

औरंगाबाद : शेतीच्या वादातून शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दोषी ठरवून तीन महिण्याची शिक्षा सुनावली.

फेरण जळगाव (ता. औरंगाबाद) येथील लिंबाजी हिवराळे हे 5 जून 2013 रोजी धम्मपाल आणि संघपाल यांच्या सोबत गट क्रमांक 29 मधील शेतीची मशागत करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गावातील अशोक पवार सुरेश पवार, आणि सांडू पवार (सर्व रा. फेरण जळगाव) हे धावत आले आमची जमीन आहे, तुम्ही कशी काय मशागत करता असा जाब विचारत त्या तिघांनी शिवीगाळ केली. त्याच्यात शाब्दीक चकमक झाली आणि कडक्याचे भांडणात संतापलेल्या अशोकने धम्मपालच्या डोक्यात सबल मारली. यामध्ये त्याचे डोके फुटले, त्यानंतर सुरेशने संघपालच्या डोक्यात घाव घातल्यामुळे त्याचे देखील डोके फुटले. दोन्ही मुले जखमी झाल्यामुळे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता लिंबाजी हिवराळे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले असल्याचे तक्रारीत म्हटले. 

या तक्रारीवरुन अशोक पवार, सुरेश पवार आणि सांडू पवार या तिघांविरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली असता सरकारी वकील शोभा विजय सेनानी यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने  अशोक आणि सुरेश पवार भादंवि 324 कलमान्वये दोषी ठरवूनन तीन महिने शिक्षा, 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावासची शिक्षा सुनावली तर सांडू पवार हे वयोवृध्द असल्यामुळे त्यांना 15 हजाराच्या बंधपत्रावर मुक्त करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com