बीड: दोन मुलांना जिवंत जाळून पिता फरार

crime
crime

माजलगाव - तालुक्यातील टालेवाडी येथील कुंदन सुधाकर वानखेडे (वय 42) याने त्याची बलभीम (अडीच वर्ष) व वैष्णव (साडेचार वर्ष) या दोन चिमुरड्या मुलांना जाळून टाकल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता 21) रात्री घडली.

या बाबत माहिती अशी, की तालुक्यातील टालेवाडी येथील कुंदन वानखेडे हा शेतीचा व्यवसाय करतो. त्याचा श्रृंगारवाडी येथील मुली सोबत विवाह झाला होता, त्यांना बलभीम हा अडीच वर्षे व वैष्णव हा साडेचार वर्षे वयाची दोन मुले होती. मागील सहा महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होता. पत्नी रेखा माहेरी येथे निघून गेली होती. बुधवारी रात्री कुंदन याने त्याच्या या चिमुरड्या मुलांना जाळून टाकून घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, कुंदनचा शोध घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com