पैठण - जागृत झाल्याशिवाय विकास अशक्य आहे. महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्ने तरुणांनी बघून ती पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याची गरज असून, नुसत्या घोषणा देऊन पोट भरू नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 20) भेट देऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, की संतांच्या या नगरीत "बये दार उघड' म्हणून संत एकनाथांनी अन्याय दूर करण्यासाठी हाक दिली; परंतु येथे मात्र तुमचे डोळेही उघडत नाहीत. त्यामुळे "बये दार उघड नाही, तर आता डोळे उघड' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. बैठकीसाठी येथे आलो. परंतु, कार्यकर्त्यांनी बैठक न घेता मेळावा घेतला. त्यामुळे बैठकीतील चर्चा नंतर करावी लागेल.'' दरम्यान, ठाकरे यांनी गोदाकाठावरील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले.
|