दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

daund
daund

केज : नापिकी व दुष्काळी परिस्थितीने शेतातील कापसाचे पीक करपल्याने शेतीच्या खर्चासाठी घेतलेली रक्कमेची परतफेड व घरखर्च भागवायचा कसा? या विचाराने आलेल्या नैराश्याने सावळेश्वर येथील राहुल दत्तात्रय दौंड (वय 25) तरूणाने शेताजवळील चिंचेच्या झाडास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार (ता. 21) घडली.

तालुक्यातील सावळेश्वर येथील तरूण शेतकरी राहुल दौंड यास साडेतीन एकर शेती आहे. चालु खरीप हंगामात शेतात लावलेले कापसाचे पिक दुष्काळी परिस्थितीने करपून गेले आहे. यातून आलेल्या नैराश्याने राहुल याने नापिकी व दुष्काळी परिस्थितीस कंटाळून त्याच्या शेतालगत असलेल्या चिंचेच्या झाडास  नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सावळेश्वरचे माजी सरपंच सुरेश संभाजी मस्के यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार युसूफवडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  खरीप हंगामात शेतात कापसाची लागवड केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील कापसाचे पिक करपून गेल्याने शेतातून उत्पन्न निघणार नाही. मग घरखर्च कसा भागवायचा व शेतीसाठी घेतलेली उसनवारी कशी परत करायची? यातुन आलेल्या नैराश्यातून राहुलने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे. 

एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी सावळेश्वर येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील व विवाहित बहिण असा परिवार आहे.  याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार अंधारे तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com