केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत- जयप्रकाश दांडेगावकर

file photo
file photo

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : केंद्र सरकारने अमलात आणलेल्या नवनवीन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छोटे कारखानदारांच्या नाकी नऊ येत असून केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत येत असल्याची टीका राष्ट्रीय सहकारी व खाजगी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी मंगळवारी (ता. ३०) केली आहे.

पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमत या संस्थेची सन २०१९-२० या आर्थिक वर्षाची ४२ वी अधिमंडळाची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी दोन वाजता झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.

यात केंद्र सरकारचे इथेनॉलचे धोरण २०१८ प्रमाणे आपल्या कारखान्यात इथेनॉलनिर्मिती क्षमता वाढविण्या बाबत ठराव घेण्यात आला. आज घडीला ३० हजार लिटर प्रति दिन निर्मिती होणारे इथेनॉल आगामी गळीत हंगामा पासून ९० हजार लिटर प्रतिदिन होणार आहे. तसेच सभेत ठेवण्यात आलेल्या विविध आठ विषयावर चर्चा होऊन त्यास सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली आहे

बैठकीसाठी आमदार राजू नवघरे, माजी आमदार पंडित देशमुख, उपाध्यक्ष प्रल्हाद काळे, शेती व ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजी देसाई, कार्यकारी संचालक आर. बी. पाटील यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com