मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या 

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या 

औरंगाबाद - मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जालना, परभणी जिल्ह्यांतील या घटना आहेत. 

अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शेतकरी देवीदास आश्रुबा काटकर (वय 55) यांनी बुधवारी (ता. 22) रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा दिलीप हा गुरुवारी (ता.23) सकाळी शेतात गेला असता हा प्रकार लक्षात आला. घनसावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. बोधलापुरी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी भाऊसाहेब शाहूराव बोबडे (45) यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. गिरगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकरी बालाजी डुबाजी कऱ्हाळे (50) यांनी शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर एका बॅंकेचे दोन लाख 50 हजारांचे कर्ज असून नापिकीला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुरुंदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com