जलवाहिन्यांवर सीसी टीव्हीचा वॉच 

जलवाहिन्यांवर सीसी टीव्हीचा वॉच 

मुंबई - शहापूरपासून मुंबईपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख जलवाहिन्यांवर सीसी टीव्ही लावण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका राज्याच्या गृह विभागाशी चर्चा करणार आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धरण परिसरात सीसी टीव्ही लावले आहेत. तेथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्याचबरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून उच्च न्यायालयाने मुंबईतील जलवाहिन्यांच्या बाजूच्या झोपड्या हटवून त्या सुरक्षित करण्याचे आदेश दिले. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या जलवाहिन्यांच्या बाजूला सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे. त्यानंतर शहापूरपासून जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. 

शहापूरमधून 100 किलोमीटर अंतरापासून मुंबईत पाणी आणले जाते. हे पाणी भांडुपमध्ये शुद्ध करून ते शहरात वितरीत केले जाते. या 100 किलोमीटरच्या लांबीवर सीसी टीव्हीचे जाळे उभारण्याचा विचार पालिका करत आहे. सध्या काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही लावले आहेत; मात्र आता संपूर्ण जलवाहिन्यांच्या परिसरात जाळे उभारण्याची शक्‍यता आहे. गृह विभागाशी चर्चा करून सुरक्षेचे उपाय करण्यात येणार आहेत. 

- भातसा धरणातील पाण्यावर पिसे येथे प्रक्रिया करून ते मुंबईत आणण्यात येते. 
- अप्पर वैतरणामध्ये वैतरणा, मोडक सागर आणि तानसामधील पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून तेथे प्रक्रिया करून ते शहरात वितरीत केले जाते. 
- शहरात 600 किलोमीटरहून अधिक प्रमुख वितरण जलवाहिन्या आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com