कल्याण - दारू पिऊन वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे स्वतःचा आणि आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांचा जीव जाऊ शकतो, हे माहित असतानाही दारू पिऊन बेशिस्त वाहन चालविणाऱ्याची संख्या वाढत आहे. त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली असून नोव्हेंबर महिन्यात 117 वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कल्याण वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.
कल्याण शहर महत्वाचे शहर आहे. कल्याण रेल्वे स्थानक, एसटी डेपो, बाजारपेठ, न्यायालय, तहसिलदार कार्यालय आणि पालिका मुख्यालय आदी महत्वाचे कार्यालये असल्याने शहरात येणाऱ्या दुचाकी, कार, रिक्षा, अवजड वाहनांची संख्या वाढत आहेत. सायंकाळी दारू बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या धर्तीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती.
यात नोव्हेंबर महिन्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 117 जणांवर कारवाई करण्यात आली होती. यात 84 दुचाकीस्वार, 17 रिक्षा चालक आणि 16 इतर वाहनचालकांचा समावेश असून डिसेंबर महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातही कारवाई सुरु राहणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.