चक्क एका फळविक्रेत्याला मिळाले पद्मश्री...जाणून घ्या कशासाठी
एकदा एका विदेशी नागरिकाने संत्री विकणाऱ्याला संत्री कशी दिली, हे इंग्रजीत विचारलं. त्या फळ विक्रेत्याला इंग्रजी कळत नसल्याने त्याला सांगता आलं नाही. आपण शिकलेलो नाही याचं त्याला फार वाईट वाटलं. आणि त्यावेळी त्याने जो पण केला व त्यातून जे काम उभे केलं त्याला खरोखरीच तोड नाही. सरकारकडे एवढी यंत्रणा असून कधी कधी सरकार करू शकत नाही ते एक सामान्य माणूस करू शकतो हे मेंगळूर येथील हरेकाला हजब्बा यांनी करून दाखवलं आहे.
स्वतः शिक्षण घेऊ शकलो नाहीत, पण गावातील मुलांना तरी शिक्षण मिळावे म्हणून फळे विकून मिळालेल्या पैशांतून गावात शाळा सुरू केली. या कार्याची दखल घेऊन कर्नाटकातील हरेकाला हजब्बा यांना भारत सरकारने (Government of India) पद्मश्री देऊन सन्मानीत केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी हरेकाला हजब्बा यांना पद्मश्री बहाल केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हरेकाला हजब्बा यांचे अभिनंदन केले. (Fruit seller in Karnataka awarded Padmashree)
हरेकाला हजब्बा सामान्य असूनही त्यांच्या असामान्य कार्यामुळे त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. स्वतः निरक्षर असूनही शिक्षणाचे (Education महत्त्व जाणून त्यांनी स्वतःजवळ असलेल्या सर्व पैशातून मेंगळूरूजवळ शाळा सुरू केली. पद्मश्री मिळाल्यानंतर हरेकाला हजब्बा रातोरात चर्चेत आले. त्यांचे कार्य, त्याग आणि विचार याबाबत अनेकांकडून कौतुक झाले.