अकरावी प्रवेशासाठी उद्यापासून अंतिम फेरी

अकरावी प्रवेशासाठी उद्यापासून अंतिम फेरी

पुणे - अकरावी प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) तिसरी फेरी घेण्यात येणार आहे. प्रवेशासाठीची ही अंतिम फेरी असून, येत्या शनिवारी (ता. २२) सायंकाळी सात वाजता या फेरीतील रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे. आतापर्यंत प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी न चुकता या फेरीत सहभागी व्हावे. यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशाबाबत कोणतीही फेरी होणार नाही, असे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने जाहीर केले आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेत एकूण सात फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम फेरी होत आहे. आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न झालेले, फेरीमध्ये ॲलोकेशन न मिळालेल्या, यापूर्वी प्रवेश घेऊन काही कारणास्तव प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले, एटीकेटी लागू असणारे आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत. गुणवत्तेचा गट आणि विद्यार्थ्यांने ऑनलाइन पद्धतीने नोंदविलेली वेळ यानुसार प्रथम ऑनलाइन क्‍लिक करण्यास प्रथम प्रवेश यानुसार या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत, असे शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com