ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आठ कामगारांचा मृत्यू : हर्षवर्धन पाटील 

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आठ कामगारांचा मृत्यू : हर्षवर्धन पाटील 

वालचंदनगर : अकोले (ता.इंदापूर) येथे नीरा - भीमा नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये आठ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

अकोले येथे आज (ता २१) मंगळवार रोजी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अपघात झालेल्या बोगद्याची ठिकाणी भेट दिली. पाटील यांनी सांगितले, की काम सुरु करण्यापूर्वी कामगारांच्या जीवाची सुरक्षितता व दुर्लक्षामुळे आठ कामगारांना जीव गमवावा लागला. यामध्ये सात कामगार इतर राज्यातील व एक स्थानिक इंदापूर तालुक्यातील काझड मधील युवकाचा समावेश आहे. अशा बोगद्याची पाच ठिकाणी कामे सुरू असून शासनाचे या कामाकडे दुर्लक्ष आहे. या कामावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम सुरू ठेवणे गरजेचे आहे.

येथे सुमारे ३०० कामगार दोन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. उपचार करण्याची साधने येथे उपलब्ध नाहीत. भूगर्भामध्ये २०० फूट आतमध्ये काम सुरू असून कामगारांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. ठेकेदाराने केवळ एक पाइप खाली सोडला असून या पाइपमधून कामगारांना पुरेसा ऑक्सिजन मिळणार आहे का? ठेकेदार कामगारांच्या जिवाशी खेळत असून या अपघातांची व कामाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com